Back to Collection
बेलवडीची राणी मल्लम्मा
एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी पश्चिम दख्खनच्या पलीकडे आपल्या सत्तेचा विस्तार करण्यास सुरुवात केली होती, तर दुसरीकडे आदिलशाही राजवट खिळखिळी होऊन तिचे नियंत्रण लहान लहान केंद्रांमध्ये विभागले जात होते.
या विखंडित राजकीय पार्श्वभूमीवर स्थानिक राज्यकर्ते केवळ मूकप्रेक्षक नव्हते; तर त्यांनी आपापल्या प्रदेशातील जमीन, साधनसंपत्ती आणि निर्णयांवर आपले वर्चस्व कायम राखले होते.
याच प्रबळ राज्यकर्त्यांपैकी एक होत्या—बेलवडीच्या राणी मल्लम्मा.